Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात

शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्धल ; पालकमंत्री शंभूराज देसाई
टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 15 : सातारा जिल्हा हा शूरवीरांचा, क्रातिकारकांचा जिल्हा आहे. देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सैनिकांचा हा जिल्हाआहे. निसर्ग संपन्नतेने आणि वैविध्यतेने नटलेल्या या सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असून विकास प्रक्रीया गतीमान करण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्यासह सर्व जिल्हावासीयांनी साथ द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्री. देसाई बोलत होते.  ध्वजवंदनानंतर श्री. देसाई यांनी पोलीस दलाची मानवंदना स्विकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या   शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेखर, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातारा जिल्ह्याने स्वातंत्र्य चळवळ, क्रांतिकारी लढे आणि स्वातंत्र्यानंतर विकासाभूमूख राजकरण या सर्व क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे भूमीपुत्र असून  जिल्ह्याच्या विकासाकडे त्यांचे विशेष लक्ष आहे.  जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देऊन श्री. देसाई म्हणाले, आपल्या जिल्ह्याचे स्व. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे  पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांना लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांनी मोलाची साथ दिली.  त्यांनी  व आत्तापर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकास कामांमुळे राज्यातच नव्हे तर देशात सातारा जिल्ह्याचा नावलौकीक आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर  जिल्ह्याचा विकास आराखडा सादर करण्यात आला. यामध्ये कृषि, पर्यटन इतर विकास कामांचा समावेश आहे. पर्यटन आराखड्या नुसार कोयनेचा भाग, कांदाटी खोऱ्यातील असे एकूण 85 किलो मिटर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यातून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर जिल्ह्याचे आर्थिक उन्नती बरोबर दरडोई उत्पन्नात वाढ होणार आहे. हा आराखडा तात्काळ पर्यटन व सांस्कृतीक विभागाकडे सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री महादेयांनी दिल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.  

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 400 आदर्श शाळा करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 50 शाळांची निवड करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील जनतेलाही चांगल्या आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रें निर्माण करण्यात येणार आहेत. शहरामधील   खासगी हॉस्पिटील असतात त्याच प्रकारे अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात येणार आहेत. डोंगर दऱ्यातील वाड्या-वस्त्या मुख्य रस्त्याचे जोडण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी डोंगरी विकास आराखडा सादर केला असून त्याध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात येईल.

सर्वसामानय नागरिकांना विविध योजनांच्या लाभासाठी शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारु लागू नये, सहज शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी शासन आपल्या दारी ही योजना सुरु केली आहे. या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पाटण तालुक्यात  करण्यात आला. आत्तापर्यंत या योजनेंतर्गत साडेचार लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे.

एक रुपयांमध्ये पिका विमा हा एक ऐतिहासिक शासनाने निर्णय घेतला आहे. याचा जिलह्यातील लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यात अग्रेसर ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, अजित पवार प्रयत्न करीत असून याला केंद्र शासनाचेही सहकार्य मिळत. तसेच महाराष्ट्रातील जवळ सर्वसाखर कारखान्यांना मिळून 10 हजार कोटींचा आयकर भरावा लागला असता तो केंद्र शासनाने माफत करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे याबद्दल त्यांनी केंद्र शासनाचे विशेष आभार मानले

पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते सत्कार

कुमारी अदिती स्वामी हिने आर्चरी या खेळात एकाच हंगाम दोन आंतरराष्ट्रीय विश्वजितेपद प्राप्त   तसेच राज्यस्तरीय शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी, विद्यार्थींनी यांनी घवघवीत यश संपादन केल्याद्दल पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. शहीद जवान सुरज शेळके यांची वीरमाता सुवर्णा व वीरपिता प्रताप, शहीद जवान सोमनाथ तांगडे यांच्या विरपत्नी रेश्मा यांना पालकमंत्री महोदयांच्या हस्ते तम्रपटांचे वितरण करण्यात आले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER