कृष्णा - खोरे उपाध्यक्ष म्हणजे अर्ध्या टी. एम. ची. चा भगीरथ अशी उपहासत्मक टिका खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार रामराजे यांची केली. ते हिंगणगाव येथे फलटण तालुका संपर्क दौऱ्यात बोलत होते.
यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, फलटण शुगर वर्क्स चे माजी चेअरमन व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हादराव साळुंखे पाटील, धनंजय साळुंखे पाटील, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, शहराध्यक्ष अमोल सस्ते, अमित रणवरे, भाजपा महिला आघाडीच्या सौ. उषा राऊत, सौ. इंगोले, हिंगणगाव, आळजापूर, कापशी, टाकूबाईचीवाडी, शेरेचीवाडी, सालपे,सासवड आदी भागातील आजी माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, रामराजे 15 वर्ष मंत्री असताना निरा -देवघर प्रकल्पाच्या फाईल वर सही केली नाही. फलटण तालुक्यातील जनतेचा 25 वर्षाचा पाण्याचा हक्क हिरावला असून तालुक्यातील जनता अशा गद्दारांना आता योग्य उत्तर देईल असे खा. रणजितसिंह म्हणाले.
आता धोम - बलकवडीच्या माध्यमातून जनतेला पाणी देण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले असून आपण केवळ तुमचा सेवक आहे असे यावेळी खासदार निंबाळकर यांनी नम्रपणे सांगितले. तर निरा - देवघर च्या अतिरिक्त पाण्यामधून आता आठ महिने सिंचणासाठी पाणी मिळणार असून लवकरच तेच पाणी 12 महिने शेतकऱ्यांना मिळेल अशी ग्वाही यावेळी खासदार रणजितसिह यांनी दिली.
फलटण तालुक्यातील जनतेला 25 वर्ष पाण्यासाठी झुलवत ठेवणाऱ्या गद्दारांना जनताच जागा दाखवून तालुक्यातमध्ये परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास यावेळी खा. रणजितसिंह यांनी व्यक्त केला.
लोणंद - फलटण रेल्वे चालत नाही असे म्हणणारे गद्दारांनी रेल्वे रुळावर झोपून दाखवावे असा टोला यावेळी खा. रणजितसिंह यांनी लागवला.
आपण फक्त धोम -बलकवडीच पाणीच आणले नाही तर वडिलांनी पाहिलेले रेल्वेचे स्वप्न लोणंद - फलटण रेल्वे प्रत्यक्षात आणून ते पूर्ण केले आहे तर लवकरच पंढरपूर रेल्वे मार्गाची निविदा निघणार असून बारामती रेल्वे मार्गाचे कामही लवकरच सुरु करू अशी ग्वाही यावेळी खा.रणजितसिंह यांनी दिली.
ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, हा संपर्क दौरा नसून हा सत्तेच्या परिवर्तन मेळावा आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून सत्तेला सुरुंग लावण्याचे काम आपल्याला करायचे आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कामाचा धडाका लावला आहे. धोम - बलकवडीच्या कामाचा धसका रामराजेंनी घेतला आहे असे यावेळी प्रल्हादराव पाटील यांनी सांगितले. केवळ निवडणूक काळात पाणी सोडून पाण्याच्या प्रश्नावर निवडणुका जिंकल्याचा टोला रामराजे यांचे नावं न घेता पाटील यांनी लागवला.
माजी आमदार कै. चिमणराव कदम यांच्या कामाचा उल्लेख यावेळी पाटील यांनी केला. विरोधकांच्या वलग्नाना आता जनता भुलणार नसून खासदारांचा मेरू कोणी रोखू शकत नाही असे यावेळी पाटील यांनी सांगितले.
खा. रणजितसिंह हे ज्या ठिकाणी चुकतील त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.असे यावेळी साळुंखे पाटील म्हणाले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आपला गट भाजपा मध्ये विलीन करण्याची घोषणा यावेळी प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी केली.
माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यावेळी बोलताना म्हणाले की, मोठे प्रकल्प या भागात आणले पाहिजेत, केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार मोठे काम करत आहेत. सामाजिक विचार सामान्यपर्यंत पोहोचला पाहिजे, तालुक्यातील केवळ डीपी बसवून चालणार नसून येणारी वीज वाढवली पाहिले हे यावेळी भोसले यांनी निदर्शनास आणून दिले. लवकरात लवकर आपले काम खासदारांच्या माध्यमातून पूर्ण होईल, वेगवेगळ्या विषयावर खासदार कार्यरत असून राजकारणा पेक्षा समाजकारवर आपण भर देणार असल्याले यावेळी भोसले यांनी सांगितले.