Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

शिवसेनेला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही : मंत्री उदय सामंत

कराड पालिकेतही भगवा फडकवू - शंभूराज देसाई
टीम : धैर्य टाईम्स
Shiv Sena doesn't need anyone's crutches: Minister Uday Samant
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यूतुबे राज्याला विकासाची नवी दिशा दिली आहे. ती दिशा सातारा जिल्ह्याच्या विकासापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून उठले पाहिजे. दोन-तीन महिन्यांवर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका आल्या आहेत.

कराड : महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यूतुबे राज्याला विकासाची नवी दिशा दिली आहे. ती दिशा सातारा जिल्ह्याच्या विकासापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून उठले पाहिजे. दोन-तीन महिन्यांवर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका आल्या आहेत. त्यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आठवड्यातील फक्त दोन दिवस पक्षासाठी देऊन कार्य केल्यास शिवसेनेला सत्तेसाठी कोणाच्याही कुबड्यांचा आधार घेण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात शनिवारी शिवसेनेच्या वतीने कराड शहर, दक्षिण, उत्तर व पाटण तालुका पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या शिव संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, तालुकाध्यक्ष रामभाऊ रैनाक, सातारा-सांगली संपर्कप्रमुख शंकर संकपाळ, कराड शहर प्रमुख शशिराज करपे, महिला जिल्हा संघटिका अनिता जाधव, कुलदीप क्षीरसागर आदी पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, कोरोना, अतिवृष्टी, महापूर अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौशल्यपूर्वक काम केले. त्याची जागतिक पातळीवर दखलही घेण्यात आली आहे. परंतु सध्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईचा भडका उडाला असून त्यामध्ये सर्वसामान्य जनता होरपळली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी उद्धव ठाकरेंचे नेतृत्व देशव्यापी करायला हवे. त्यानुसार धोरणात्मक काम सुरू असून फक्त साताराच नव्हे तर महाराष्ट्रात शिवसेनेची स्वबळाची तयारी सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने स्थानिक पातळीवर आपापली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणे गरजेचे असून कराड कराड नगरपालिकेतही नक्कीच भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, प्रत्येक गावागावापर्यंत व घराघरापर्यंत शिवसैनिकाच्या माध्यमातून केलेले काम  पोहचवण्याची जबाबदारी सर्व शिवसैनिकांनी पार पाडायची आहे. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एकाच दिवशी 425 शाखांचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. त्या प्रत्येक शाखाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी काळात झपाटून काम केली पाहिजे. जिल्ह्यातील शिवसैनिक पेटला तर तो काय करू शकतो, हे जिल्ह्याने पाहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेची घोडदौड आणखी जोरदार सुरू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, अतिवृष्टी काळात झालेल्या नुकसानग्रस्त भागातील कामे 15 दिवसाच्या आत पूर्ण केली आहेत. पाटण तालुक्यामध्ये 21 हजार 500 कुटुंबांना पहिल्या लॉकडाऊनमध्ये लोकांना दोन महिन्याचे घरपोच धान्य दिले. कोरोना काळातही गरजूंना मदत करण्यासाठी येथील प्रत्येक शिवसैनिक झटला आहे. तसेच या काळात पोलिस बांधवांनीही 18-18 तास काम केले आहे. या काळात जीव गमावलेल्या पोलीस बांधवांना आधार देण्याचे काम सरकारने केले आहे. शिवसेनेच्या जिल्हा, तालुका प्रमुखांनी विकास कांबळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाटून दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. तसेच विकासाचे काम करताना साधा शिवसैनिक डोळ्यासमोर ठेवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन करून कराड नगरपालिकातेही चांगल्या प्रकारे काम करून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू, असा शब्दही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्री उदय सामंत यांना दिला.
जिल्हाध्यक्ष शेलार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून जिल्हाभरात अनेक विकास कामे झाले आहेत. तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी आतापर्यंत 750-800 कोटी रुपयांचा निधी आला आहे. ती विकास कामे शिवसैनिकांनी लोकांपर्यंत पोहोचवायला हवीत. केंद्र सरकारने करवाढीच्या रूपात लोकांवर अन्याय केला आहे. त्यांनी जनतेचे आधार कार्ड बनण्याऐवजी ते एटीएम कार्ड झाले आहेत. या परिस्थितीला लगाम घालण्यासाठी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागांवर भगवा फडकला पाहिजे. त्यानुसार सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागले पाहिजे, असे आवाहन करून जिल्ह्यात जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी प्रयत्न असल्याचे आश्वासन शेलार यांनी यावेळी मंत्री महोदयांना दिली.
दरम्यान, मंत्री उदय सामंत, शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत मोहसीन शेख, दिलीप मुठ्ठल, फिरोज मुल्ला, कृष्णात पवार, वामन कांबळे, तानाजी भोसले आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. तत्पूर्वी, पाटण तालुक्यातील शिवसेनेच्या गायकवाडवाडीच्या सरपंच रेशमा पवार व चिखलीचे कुलदीप क्षीरसागर यांचा मंत्री सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER