महानुभाव पंथाची तसेच जैन धर्मियांची दक्षिण काशी व ऐतिहासिक दृष्टीने महत्व प्राप्त झालेल्या,श्रीक्षेत्र फलटण येथील घोडा यात्रा म्हणजेच श्री चक्रपाणी प्रभू पालखी महोत्सव ६ एप्रिल पासून सुरू होत आहे दररोज संध्याकाळी महाआरती नंतर ठीक सायंकाळी ७ वा श्रीकृष्ण मंदिरातून छबिना वाद्यांचा गजरात रात्री १० पर्यंत श्रीमंत आबासाहेब मंदिरात पोहचतो व तेथील महाआरती संपन्न होते.यात्रेचा मुख्य दिवस हा ११एप्रिल रोजी आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून संपूर्ण भारतात ओळख असणाऱ्या फलटण ची घोड्याची यात्रा पहाण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात
या वेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .व्याख्यानमाला , व्यसनमुक्ती, प्रबोधन, कीर्तनाच्या माध्यमातुन समाज प्रबोधन व लहानमुलांचे शिबीर,अन्नक्षेत्र च्या माध्यमातून अन्नदान असे अनेकविध उपक्रम श्री कृष्ण देवस्थान ट्रस्ट तर्फे तसेच फलटण येथील स्थानिक सर्व संत महंतांच्या उपस्थितीत संपन्न होत असतात.
यात्रेचा मुख्य दिवशी ११ एप्रिल रोजी भव्य दिव्य स्वरूपात अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष व श्री कृष्ण देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष महंत श्री विद्वांस श्यामसुंदर शास्त्री महानुभाव च्या हस्ते श्रीच्या मूर्तीला मंगल अभिषेक पुष्पहार विडा समर्पण होऊन पालखी पूजन होते महाआरती नंतर पालखीची मिरवणूक दुपारी एक वाजेपासून संध्याकाळी सात पर्यंत फलटण शहरातून हर्ष उल्हासात संपन्न होते.यायात्रे करिता महाराष्ट्रातुन अनेक भाविक भक्त या ठिकाणी येतात.धार्मिक सोहळ्याचा ज्ञानदानाचा अन्नदानाचा व प्रभू दर्शनाचा आंनद घेतात.