Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

सहकारमंत्री आहात की, सह्याद्रीचे चेअरमन हे स्पष्ट करा!

राजू शेट्टींचे बाळासाहेबांवर शरसंधान
टीम : धैर्य टाईम्स
Explain that you are the Minister of Co-operation, Chairman of Sahyadri!
सहकारमंत्र्यांनी तीन तुकड्यात एफआरपी देण्याचे जाहीर केले. परंतु, स्व. यशवंतराव चव्हाण, पी.डी पाटील साहेबांचा वारसा सांगणाऱ्या सहकारमंत्र्यांनी सहकाराची भूमिका घ्यायला हवी. मात्र, तेच भक्षकासारखे वागत असून त्यांनी आपण सहकारमंत्री आहोत; की सह्याद्रीचे चेअरमन हे आधी स्पष्ट करावे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर शरसंधान साधले.

कराड : सहकारमंत्र्यांनी तीन तुकड्यात एफआरपी देण्याचे जाहीर केले. परंतु, स्व. यशवंतराव चव्हाण, पी.डी पाटील साहेबांचा वारसा सांगणाऱ्या सहकारमंत्र्यांनी सहकाराची भूमिका घ्यायला हवी. मात्र, तेच भक्षकासारखे वागत असून त्यांनी आपण सहकारमंत्री आहोत; की सह्याद्रीचे चेअरमन हे आधी स्पष्ट करावे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर शरसंधान साधले.
येथील शासकीय विश्रामगृहात चालू ऊस गळीत हंगामातील एफआरपीप्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सोमवारी दि.25 रोजी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. शेट्टी म्हणाले, कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, सातारा-सांगली-सोलापूर जिल्ह्यातील कारखादारांना मस्ती आली आहे. दस्तुरखुद्द सहकारमंत्र्यांनी तीन तुकड्यात एफआरपी देण्याच्या गोष्टी करणे ही निंदनीय बाब आहे. सातारा जिल्ह्यातील कारखानदार व शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केली होती. मात्र, त्याला सहकारमंत्र्यांनी खो घातला असावा, अशी टीकाही त्यांनी यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर केली. तसेच त्यांना सहकारमंत्र्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायची वेळ आली असल्याचा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी यावेळी दिला.
खा. शेट्टी पूढे म्हणाले, दहा वर्षात पहिल्यांदाच साखरेला सुवर्णकाळ आला आहे. त्यामुळे बाजारभावानूसार एफआरपीपेक्षा जादा सादर कारखानदारांनी देणे अपेक्षित आहे. दरम्यानच्या काळात महापूर, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अशा काळात एक रक्कमी एफआरपी न देता शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरही पाणी फिरवण्याचे कामही सहकारमंत्र्यांनी केले असल्याचा आरोपही खा. राजू शेट्टी यांनी यावेळी केला.
साखर उद्योग अडचणीत असताना आम्ही नरमाईची भूमिका घेतली. मात्र, आता सुवर्णकाळ असताना आम्ही गप्प बसणार नाही. राज्यातील जे-जे साखर कारखाने एक रखमी एफआरपी देणार नाहीत, त्या कारखान्यांची ऊस वाहतूक अडवून आम्ही कारखाने बंद पाडू, असा इशारा देत आंदोलनात ज्या संघटना आमच्या सोबत येतील; त्यांना बरोबर घेऊन हा लढा देणार असल्याची माहितीही खा. शेट्टी यांनी दिला.
केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या आंदोलनाला जातीय, प्रांतीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. अदाणी, अंबानींना शेतकऱ्यांना लुटता यावे, असे तीन कायदे त्यांनी मंजूर केले. त्यामुळेच शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले असून त्याला देशभरातील शेतकऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता शेतकरी मागे हटणार नाहीत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER