फलटण तालुक्यातील गोरगरीब जनतेचा खरा आधारस्तंभ म्हणून ओळख असलेले माजी खासदार कैलासवासी हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकाळात जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले. सर्वसामान्यांच्या घरात जाऊन त्यांच्यासोबत भाकरी-भाजी खाणारा, त्यांच्या दुःखात सहभागी होणारा नेता अशी त्यांची ओळख होती. आजही फलटणकर त्यांना “आपला माणूस” म्हणून आठवतात.
त्याच विचारांचा वारसा पुढे नेत, त्यांचे चिरंजीव आणि फलटण नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर हे आज खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी म्हणून उदयास आले आहेत. वडिलांकडून मिळालेली समाजसेवेची प्रेरणा त्यांच्या कार्यात स्पष्टपणे दिसून येते. “मला समाजाची सेवा करायची आहे” हा ध्यास त्यांनी मनाशी बाळगला असून, त्याच ध्येयाने ते कार्यरत आहेत.
नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या बैठकीत त्यांनी शहरातील विविध सभागृह व ठिकाणांना महापुरुषांची नावे देऊन त्यांना अभिवादन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे फलटण शहरात सर्वत्र स्वागत झाले असून, पहिल्याच बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे नागरिकांच्या अपेक्षा अधिकच उंचावल्या आहेत.
समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची कार्यशैली ही साधी, सरळ आणि लोकाभिमुख आहे. मोठ्या राजकीय घराण्यातील असतानाही सर्वसामान्यांसारखे जीवन जगण्याचा त्यांचा स्वभाव, त्यांना जनतेच्या अधिक जवळ घेऊन जातो. “माझं ते चांगलं, त्यापेक्षा चांगलं ते माझं” ही त्यांची विचारसरणी त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असला, तरीही साधेपणाने आणि कोणताही डामडौल न करता हा दिवस साजरा करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या संवेदनशीलतेचे द्योतक आहे. समाजातील दुःखद घटनांचा विचार करून त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा घेतलेला निर्णयही त्यांच्या सामाजिक जाणिवेचे प्रतीक आहे.
चार दशकांची राजकीय व सामाजिक परंपरा लाभलेल्या नाईक निंबाळकर कुटुंबातील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांसारख्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली समशेरसिंह नाईक निंबाळकर हे फलटण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत. शहरातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा, मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, हा त्यांचा निर्धार आहे.
फलटणच्या जनतेसाठी काम करणाऱ्या या तरुण, अभ्यासू आणि संवेदनशील नेत्याला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या हातून असेच लोकहिताचे कार्य घडत राहो आणि त्यांना शतायुष्य लाभो, हीच फलटणकरांची सदिच्छा.
फलटणच्या राजकीय, सामाजिक आणि विकासाच्या प्रवासात ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणजे युक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे पाहिले जाते. लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे संस्कार आणि विचारांची शिदोरी लाभलेले समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी बालपणापासूनच समाजकारणाची दिशा स्वीकारली. जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे ते ज्येष्ठ बंधू असून, त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा त्यांनी समर्थपणे पुढे नेली आहे.
फलटण नगर परिषदेमध्ये तब्बल पंधरा वर्षे नगरसेवक म्हणून कार्य करताना त्यांनी विकासकामांना गती दिली. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवत जनतेच्या हक्कांसाठी आवाज उठवला. त्यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेतील कामकाज अधिक पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख झाले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, प्रकाशयोजना अशा मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणत नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे आणि कार्यतत्परतेमुळे फलटण शहर प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे.
समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि जनतेप्रती असलेली अपार बांधिलकी. प्रत्येक सामान्य माणसाशी जुळणारा त्यांचा स्वभाव आणि समस्यांकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे ते सर्वसामान्यांच्या मनात घर करून आहेत.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि त्यांच्या कार्याला अधिकाधिक यश लाभो, हीच सर्वांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा!
सचिन मोरे , संपादक - धैर्य टाईम्स,










